Wednesday, July 15, 2020

ॐ काराचा महिमा ( Omkar Mahima )

                                                           ।। श्री शंकर ।।


                                                 ॐ काराचा  महिमा


श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात " गिरमसम्येकमक्षरं "... 

गिरा म्हणजे वचन, वाणी किंवा बोलणे. वाणीचे एक अक्षर . हे अक्षर प्रत्यक्ष माझेच म्हणजे विष्णू /कृष्णाचे रूप आहे. उपनिषदे आणि गीतेमध्ये ओंकाराचे सत्वरूप उलगडून तोच परमात्मा आहे असे सांगितले आहे. 

ज्ञानेश्वर माउलींनी  कार रूपांत गणेशाची प्रचिती घेतली. शंकराला ओंकारेश्वर ह्या नावाने संबोधित करतात. 

विश्वाच्या अणुरेणूंत भरलेले आत्मतत्व वेदांनी ओंकारातच प्रतिपादित केलेले आहे. म्हणजे एकाक्षरी ब्रह्म. सर्व ब्रह्माण्डाचे सार. प्रणवाचे स्फुरण. सृष्टीचा प्रारंभ ह्या अक्षरानेच झाला. 

संपूर्ण ब्रह्माण्डात हाच नाद / ध्वनी सतत गुंजत असतो.

अ ,उ ,म ह्या तीन मात्रा आणि चंद्रकोर आणि बिंदू हि अर्धी मात्रा मिळून हा महामंत्र / बीजमंत्र  तयार होतो. 
अ हे स्थूल जगाचे प्रतीक, उ हे सूक्ष्म जगाचे प्रतीक आणि म हे कारण जगताचे प्रतीक आणि बिंदू मनाचे प्रतीक.  तीन जगांचे प्रतीक (भू, भुवः, स्व:), तीन अवस्थांचे प्रतीक (जागृत, स्वप्न, सुषुप्ती), त्रिकालाचे प्रतीक (भूत, भवत, वर्तमान) आहे.

"ॐ कार रुपी धनुष्यावर आत्मरुपी बाण चढवून परब्रहम परमेश्वरालाच लक्ष्य करावे. "असे उपनिषदात म्हटले आहे. सामगान ,मंत्रपठण,अध्ययन,ब्रह्मप्राप्ती साठी  काराचा उपयोग होतो. 

ॐ स्वयंभू  आहे. पवित्र आणि शक्तिशाली आहे. 

आपल्या संस्कृतीत आणि हिंदू धर्मात प्रणवरूपी  काराचा विशेष महिमा कथन केला आहे. मोक्ष हाच इथे अंतिम पुरुषार्थ. म्हणूनच  कार साधनेने हे ध्येय निश्चित गाठता येते. कार्यसिद्धी होते. 
त्याचे स्मरण, चिंतन, ध्यान, जप करणारा मनुष्य परमात्म्याची प्राप्ती करतो. त्याच्या रुपांत मिसळून जातो.
 
ध्यान करतांना परमतत्वाचे प्रतीक म्हणून ॐचा वापर करतात

 कार जपाचा विशेष फायदा होतो. जपयज्ञामुळे सर्व दोषांपासून मुक्ती होते. तो सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. 

 कारात जीभ आणि ओठांची हालचाल होत नाहीं. त्याचा उच्चार गळ्यातून होतो आणि संबंध थेट हृदयाशी असतो. त्यामुळे ईश्वराशी अनुसंधान लवकर साधले जाते. एकांत स्थळी, सहजासनात बसून वैखरी वाणीने प्रणवाचा दीर्घ उच्चार करावा. हा उच्चार कानांनी ऐकावा. मनाने चिंतन करावे. अशा तीन गोष्टी साध्य होतात. जपाचे अनुष्ठान केल्यामुळे शोक, दुःख नाहीसे होते. आसक्तीचा नाश होतो. संकल्प विकल्पातील दोलायमान अवस्था नाहीशी होऊन  मन शांत स्थिर होते. आत्मस्फुरण उरते. 

वेदांनी जो नाममंत्र शोधून काढला त्याचा  हा राजा आहे. नुसत्या ॐ व्यतिरिक्त ॐ नमः शिवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय अश्या मंत्राचेही पठण करता येते. गायत्री मंत्र, महामृत्युन्जय मंत्र म्हणताना प्रारंभी  म्हणतात. अनेक स्तोत्रांची सुरवात  ने करतात. 

संगीत हा  ह्या दिव्य मूलध्वनीचा अविष्कार आहे. ह्या नादब्रह्माचा परिणाम माणसाच्या मनावर, मज्जातंतू वर आणि अंतर्मनावरहि होतो. त्यामुळे आत्म्याचे संगीत ऐकू येते. आनंदप्राप्ती होते. त्यामुळे संगीत साधनेतही  काराचा अंतर्भाव करतात. 

शरीरस्वास्थ्यासाठी आपण सूर्यनमस्कार घालतो तेव्हाही ॐ चा उच्चार करतो.

स्त्रियांनी मात्र हि ओंकार साधना करू नये असा संकेत आहे. त्याच्या कंपनांचे त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होतात.
 
असा हा . आपले दैनंदिन जीवन ओंकारमय आहे. त्याच्या साधनेने आपणा सर्वांना इप्सित यश प्राप्त होवो हीच प्रार्थना ... 

संदर्भ : गीतासागर ( विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर )


सौ .स्नेहा भाटवडेकर 
विलेपार्ले ,मुंबई ४०००५७
ई मेल : sneha8562@gmail.com

 





No comments:

Post a Comment