Sunday, May 17, 2020

HELLO...HELLO..... हॅलो ... हॅलो ...

                                  ।।      श्री   शंकर   ।।

                                         हॅलो  .... हॅलो .... 



        आज जागतिक दूरसंचार दिन.  त्या निमित्ताने काही स्मृती सचेतन झाल्या.

"STAY CONNECTED " ह्या भावनेंत  Telecommunication चे सामर्थ्य दडलेलं  आहे. आज घराबाहेर पडायची बंदी असतांना समाजांशी प्रत्यक्ष जोडण्याचे काम ह्या Communication Network मुळे शक्य झाले.
घरातला बंदिवास सुसह्य झाला. " Thanks World Telecommunication "

मुंबई महानगरावर  अधिराज्य गाजवणाऱ्या आणि संपूर्ण जगाशीं संपर्क असलेल्या M.T.N.L. ची आज प्रकर्षाने आठवण झाली. सुरवातीला बॉम्बे टेलिफोन्स ह्या नावाने असलेल्या संस्थेचे रूपांतर पुढे महानगर टेलिफोन लि .मुंबई मध्ये झाले.ते वर्षं होतं १९८६.

सुमारे १८८२  मध्ये स्थापन झालेली " पोस्ट आणि टेलिकम्युनिकेशन" च्या सेवेअंतर्गत सामावणारी टेलिफोन सेवा मुंबईच्या जडघडणीत एक महत्वाचा टप्पा ठरली. मुंबईनंतर दिल्लीत हि सेवा सुरु झाली. ब्रिटिशांनी मुंबई बंदराचे व्यापारी महत्व चाणाक्ष नजरेने केव्हाच हेरले होते. त्यामुळेच बॉम्बे टेलिफोन्स  ची घोडदौड इथे सुरु झाली. जनसंपर्क आणि अर्थातच पुढे व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने हे जाळे वाढू लागले.आणि पुढे त्याचे महाजालात रूपांतर कधी झाले ते समजलेच नाही. विस्तारणाऱ्या  अफाट मुंबईला सेवा पुरविण्यासाठी अनेक दूरभाष केंद्रांची स्थापना झाली. ह्या केंद्रात कामकाजासाठी असलेला ऑपरेटर आणि इतर कर्मचारी वर्ग वाढत होता. लाईनमन" फिल्ड वर्क" साठी नियुक्त केले गेले. हि संख्या हजारोंच्या घरात पोहोचली.

मला आठवतं ,मी स्वतः फोन  साठी अर्ज केला तेव्हा मला ७ वर्षे फोनची वाट बघावी लागली होती. नंबर लागल्यावर कोण आनंद झाला होता. तेव्हा मुंबई बाहेर फोन  लावायचा म्हणजे एक दिव्यच असे. परदेशात फोन करण्यासाठी मग विदेश संचार निगम ची स्थापना झाली. ह्या सगळ्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला उत्तम चालना  मिळाली.  १ Rs .ची टेलिफोन बूथची त्या वेळेला खूपच चलती  होती आणि सर्वसाधारण जनतेला ह्या फोनचा खूप आधार वाटत असे. अनेक अपंग व्यक्तींना ह्याद्वारे रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले होते.

सर्व जगांत तंत्रज्ञानाची क्रांती झाली ती २००० सालच्या आगमनाबरोबरच  . १९९५ साली संगणक अवतरले.त्या पाठोपाठ इंटरनेट .आणि आता तर मोबाईल मुळे सर्व जगच 'अपनी मुठ्ठीमें ' अशी परिस्थिती आहे.

अनेक खाजगी कम्पन्यांनी globalisation policy ला अनुसरून टेलिफोन विश्वात धडक मारली ;स्पर्धा वाढू लागली .बाहेरच्या जगांत घडणाऱ्या अफाट घडामोडीना  तोंड देण्याचे सामर्थ्य कदाचित कमी पडले असावे. ह्या आक्रमणाने  M.T.N.L.ची हळूहळू घडी विस्कटत  गेली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक पर्यायी मार्गांचा अवलंब करूनही फारसे यश मिळाले नाही आणि हळूहळू नवरत्नांपैकी एक असलेली हि कंपनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडू लागली." कालाय तस्मै नमः "

जानेवारी २०२० मध्ये आलेल्या Compulsory  Retirment Scheme  मुळे आज अगदी अपुऱ्या मनुष्य बळावर Telephone Ex. चालवली जात आहेत.

आजवर अनेक कुटुंबाना पोसणारी  MTNL " कुणी फोन घेता का फोन" असा आर्त सवाल करतेय भारतीय अर्थव्यवस्थेत कार्यरत असणाऱ्या निम सरकारी कंपन्यांपैकी हि एक आघाडीची कंपनी, अहोरात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांपकी एक. अवघ्या मुंबापुरीची हेल्पलाइन

परवा  कामानिमीत्त टेलिफोन केंद्रात  जायची वेळ आली.  MTNL चे  पूर्वीचं वैभव आठवून जीव कासावीस झाला. सगळी इमारत अगदी शांत ,स्तब्ध .

एकेकाळी चैतन्याने सळसळणारी  आपली" संवादिनी "आज अशी मूक झालेली  बघून मन अबॊल झालं .
पुनःश्च हरिओम ह्या न्यायाने पुन्हा एकदा ह्या सेवेला झळाळी प्राप्त होईल आणि हि केंद्रे पुन्हा नवीन जोमाने कार्यरत होतील ... मन में हैं विश्वास ,पुरा है विश्वास ...

9 comments:

  1. खूप यथार्थ वर्णन केले आहे.MTNL chi attachi sthiti pahun kharch vait vatate.

    ReplyDelete
    Replies
    1. एमटीएनएल च्या परिस्थितीला त्यांचा कामगार वर्ग व अधिकार वर्ग जबाबदार आहे..त्यांनी अरविंद सावंत यांच्यासारख्या राजकारणी नेत्याला डोक्यावर घेतलं व अनेक नुकसानकारक खोगीरभरती व इतर निर्णय घ्यायला व्यवस्थापनाला भाग पाडलं.अनेक अकुशल लोकं वरच्या पदाला पोहचले ज्यांना कामाची काही माहिती व जबाबदारी ची जाणीव नव्हती.

      Delete
  2. Khup sunder apan Bombay telephones la visru shaknar nahi khup chn lihila ahes

    ReplyDelete
  3. Sundar ajachya sthiteche nemake varnan

    ReplyDelete
  4. आपल्या विचारांशी पूर्ण सहमत आहे खूप छान लिहिले आहे.

    ReplyDelete