ll Stay Home ll
"धाव
रमापते ज्ञानविलासा l पूर्णपरात्पर शांतिनिवासा"
करुणाव्याप्त आर्त स्वर क्षीरसागरात
पहुडलेल्या नारायणाच्या कानावर आला. तेव्हढ्यात पृथ्वीमाता
नारायणासमोर शिष्टमंडळ
घेऊन हजर झाली. नारायणाला नमस्कार करून , तिने तिथे येण्याचे
कारण
सांगितले.
व्यथित
झालेली पृथ्वीमाता तिथे घडणाऱ्या घडामोडी सांगत होती. घराला घरपण देण्याऐवजी माणसे
मात्र स्वतःचे घर सोडून, दिवस-
रात्र कामात व्यस्त असतात. इथे घरे ओस आणि बाकी ठिकाणे
माणसांनी भरून वाहत आहेत. रस्ते, वाहने स्टेशन्स, विमानतळ सगळीकडे
तुडुंब गर्दी, कोलाहल. नुसता माणसांचा पूर. जरा सुट्टी मिळाली कि लोक weekend एन्जॉय
करायला घराबाहेर पडतात. नाटक, सिनेमा, सण- समारंभ , व्यापार पेठा, प्रदर्शने , परदेशवाऱ्या ह्या गोष्टींचे एवढे पेव फुटले आहे कि माणसे स्वतःचे घर सोडून सगळीकडे नुसती
फिरतायत. काहीवेळा हे बाहेर पडणे गरजेचे असते, पण बऱ्याच वेळा ही भटकंती फक्त
ENJOYMENT म्हणूनच असते. ह्या सगळ्या प्रचंड गर्दीचा ताण माझ्यावर पडतोय.
कोणत्याही गोष्टीचा l अतिरेक तो झाल्या साचा ll
त्याचा आहेच व्हावयाचा l बोजवारा तो केव्हाही ll
ह्यावर काहीतरी उपाय सांगा, भगवान I
अंतर्ज्ञानाने नारायणाने सर्व
परिस्थिती जाणली आणि त्याला पृथ्वीची खूप दया आली. आता वेळ
आलेली आहे माणसाचे डोळे
उघडायची, नाहीतर परिस्थिती
हाताबाहेर जाईल. नारायणाने पृथ्वीमातेला
आश्वस्त केले, तू
काळजी सोड आणि परत स्वगृही जा. माणसाचे कर्मच तुला ह्या
परिस्थतीतून
बाहेर काढेल. "नारायण, नारायण" म्हणत नारद मुनींनी
पृथ्वीवर फेरफटका मारला आणि सगळ्या
परिस्थितीची पाहणी केली.
इकडे पृथ्वीवर एका विषाणूचे
आगमन झाले व बघता बघता तेथील माणसांना त्याची लागण लागली.
विषाणूंचा प्रभाव एका देशातून दुसऱ्या देशांत होऊ लागला. संसर्ग वाढत चालला. माणसे
हवालदिल झाली. लागण झालेल्यांची संख्या वाढू लागली. लोक मृत्युमुखी पडू
लागले. सगळीकडे हाहाक्कार माजला.
ह्या परिस्थिती माझारी l रोग बळावती भारी ll
राज्यकर्ते जागे झाले. माणसांवर कठोर
निर्बंध लादले गेले. सगळीकडे LOCKDOWN करण्यात आला. प्रवासी
साधने बंद झाली. जनजीवन, उद्योगधंदे सारे काही ठप्प
झाले. लोकांना परोपरीने घरातच राहण्याचे आदेश दिले गेले. माणसांना त्याशिवाय आता
पर्यायच नव्हता. मॉल, नाट्यगृहे, सिनेमा
थिएटर, बस, गाड्या, मेट्रो, अगदी सगळे ठप्प. अहो इतकेच नाही तर सण, उत्सव
सगळ्या कार्यक्रमांवर बंदी, आणि बिचारे देवळातले देव ही
देवळात एकटेच उभे...
असे म्हणतात कि ब्रह्माच्या ठिकाणी “ एकः अहं बहू
स्याम ” अशी स्फुरणरूप इच्छा उत्पन्न झाली आणि तेथून सृष्टीचा प्रारंभ झाला. हीच भावना
सर्व माणसांमध्ये असल्याने तो एकटा राहू शकत नाही. एकटेपणाचा त्याला कंटाळा येतो.
Sharing करण्यासाठी कोणी तरी असावे असे त्याला वाटते आणि त्यातूनच पसारा वाढत जातो.
मूल जन्माला आले कि सुरवातीला फक्त
कुटुंबाबरोबरच असते. तिथेच हळूहळू मोठे होते. शाळेत जायला आई- वडील प्रोत्साहित
करतात आणि मग त्याचे समाजाशी नाते जुळायला लागते. पुढे महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी, व्यवसाय ह्यामुळे घरापलीकडे इतर सगे सोयरे,
मित्र परिवार, colleagues
असा परीघ आणखी वाढू लागतो. समाजाशी नाते अधिकाधिक घट्ट होते.
आजच्या बदलत्या काळांत तंत्रज्ञान
एव्हढे विकसित झाले आहे कि सोशल मीडिया चे प्रस्थ प्रचंड प्रमाणात वाढले आहे. TV,
Computer, Mobile, Internet, Whats App ह्या साधनांमुळे, वेगळ्या माध्यमांतून
, माणूस समाजामध्ये कनेक्ट होतोय. पण वस्तुस्थिती अशी आहे कि, ह्या सर्व पसाऱ्यात तो
स्वतःला आणि नातेवाईकांना दुरावत चाललाय. कदाचित हे सर्व सुधारावे म्हणूनच आजची परिस्थिती
निर्माण झाली असावी.
आपण इकॉनॉमिक्स मध्ये कायम शिकत आलोय
कि " MAN IS A SOCIAL ANIMAL
" पण आज ह्याच
समाजापासून विलग होऊन पुन्हा त्याला त्याच्या घरट्यात जायला, तिथेच राहायला भाग पाडलंय, एका विषाणूने. अगदी
मुख्यमंत्री, पंतप्रधान सगळ्यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय, STAY HOME . सतत काही ना काही कारणानें बाहेर धावणाऱ्या समाजाला पुनश्च एकवार घरांत,
बंधनात डांबण्यात आलंय. स्वतःच्या घरांत तुम्ही कसे सुरक्षित आहात,
कुटुंबाबरोबर तुमचा वेळ कसा घालवू शकता, फावल्या
वेळेचा सदुपयोग कसा करू शकता, ह्याच्या टिप्स देण्यासाठी
सर्वजण सरसावले आहेत, आहे कि नाही गम्मत ?
ह्या निमित्ताने सतत धावणारे गतिमान जग, थोड्या काळापुरते विसावलंय. घरा-घरांत माणसे आपल्या कुटुंबाच्या बरोबर
एकरूप होतायत, कुटुंबप्रेम अनुभवतायत, स्वास्थ्य जपतायत, गृहिणीच्या
हातच्या सुग्रास अन्नाची चव चाखतायत, कधी स्वतःचं पाक-कौशल्य अजमावतायत, स्वयं शिस्तीचे पालन करतायत. बाहेर सुद्धा Social Distancing ची मर्यादा पाळली जातेय. नाक्या-नाक्यावरचे अड्डे थंडावले आहेत, CCD
, Barista , MacD हे सध्या ओस पडलेत.
" मी" चा via समाज, प्रवास, पुन्हा कुठेतरी” मी ” पाशी येऊन ठेपलाय. एक वर्तुळ पूर्ण होतंय. सतत
बाहेर धावणारे मन अंतर्मनात डोकावतंय. स्वतःचा शोध घेतंय.
पृथ्वीने सलग काही दिवस एक असीम शांततेचा
अनुभव घेतला. पण इतक्या वर्षाची अंगवळणी पडलेली सवय, तिला ही आता अस्वस्थ
वाटू लागले. खूप झाला हा खेळ. लोक ह्या अनुभवानंतर नक्कीच शहाणे होतील. आता त्यांना
जास्त त्रास नको. तिने नारायणाशी Video Call वर संपर्क
साधला. सगळे दिग्गज आपापल्या ठिकाणी बसून मास्क लावून ह्या मीटिंग मध्ये सहभागी
झाले होते, माणसांपासून Social Distancing त्यांनाही हवेच होते. पृथ्वी मातेने सर्व परिस्थितीचा अहवाल सादर केला. "खूप कठोर शिक्षा
सगळ्यांनाच भोगावी लागत आहे, माणसे ह्यातून नक्की धडा घेतील, शहाणी होतील, आता अधिक न ताणता सर्वांना ह्या
महामारीपासून वाचवा ”, तिने प्रार्थना केली.
नारायण म्हणाले “तथास्तु”
वसंत ऋतू मुळे बहरलेली पृथ्वीमाता
सगळ्यांसमवेत पुन्हा एकदा गतिमान झाली...आनंदाचे गीत गाऊ लागली .... मुक्तकंठाने
नारायणाचे स्तवन करू लागली...
No comments:
Post a Comment